गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - भाजपची मागणी

September 20,2020

मुंबई : २० सप्टेंबर - महाविकास सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनीच प्रयत्न केला होता, पण तो वेळीच हाणून पाडला, असा धक्कादायक गौप्यस्फोट खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. आता त्यावर भाजपनं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जहरी टीका केली आहे.

राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर आहेत. त्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अनिल देशमुख यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात काय कारवाई केली, याची माहिती जनतेपासून का लपवून ठेवली? या गृहमंत्र्यांचे आयपीएस अधिकाऱ्यांना दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणी दोन महिन्यात एक इंचही पुढे सरकता आलं नाही. त्यांना राज्य सरकार पाडण्याचं बळ कुठून आलं? असे सवाल देखील आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहेत.