विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रावरून आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु

May 15,2021

मुंबई : १५ मे - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. या पत्रानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून फडणवीस यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केले असून, “यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?,” असं प्रश्नही उपस्थित केला आहे.

फडणवीस म्हणाले, “अगदी १३ मे रोजीच्या आकडेवारीचा विचार केलातरी देशातील एकूण करोना रूग्णांमध्ये महाराष्ट्रातील रूग्णांचे प्रमाण हे २२ टक्के आहेजे सातत्याने ३० टक्के आणि त्याहून अधिक राहिले आहेदेशात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण ३१ टक्केतर सक्रिय रुग्णांचे प्रमाण सुद्धा १४ टक्के आहेत्यामुळे देशातील करोनाच्या स्थितीचा विचार करताना महाराष्ट्राची स्थिती दुर्लक्षित करता येणार नाहीत्यामुळे महाराष्ट्रातील स्थिती सुधारलीतर केंद्र सरकारच्या संसाधनांवरील ताण कमी होईल आणि देशातील करोनाचा लढा अधिक ताकदीने लढता येईलयाच्याशी आपण सहमत असालचआज महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली जाते आहेज्यात .८० कोटी वॅक्सिन्स लाखांहून अधिक रेमडेसिवीर१७५० मेट्रिक टन ऑक्सिजनकितीतरी व्हेंटिलेटर्सबायपॅप आणि ऑक्सिजन काँन्सट्रेंटर्सचा समावेश आहेअसं असलं तरी काही लोकांना मोदींवर टीका करणेहे त्यांच्या राजकारणाचे अंतिम लक्ष्य वाटते,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज्यातील सरकारला आणि काही माध्यमांना मुंबई म्हणजेच महाराष्ट्र असं वाटतंआता समजा मुंबईची स्थिती पाहिली तरी येथे चाचण्या कमीत्यातही रॅपिड अँटीजेनचे प्रमाण अधिक ठेऊन एक नवीन मॉडेल तयार करण्यात आलेकरोनामुळे होणारे मृत्यू सुद्धा मोठ्या प्रमाणात लपविले जात आहेतअन्य कारणांमुळे झालेले मृत्यू या वर्गवारीचे राज्यातील अन्य जिल्ह्यांचे प्रमाण . टक्के असताना एकट्या मुंबईत ते ४० टक्के आहेमुंबईत दरवर्षी सरासरी ८८ हजार मृत्यू होतातपण२०२० या वर्षांत यात २०,७१९ मृत्यू वाढलेयातील ११,११६ मृत्यू केवळ करोनाचे दाखविलेम्हणजे प्रत्यक्षात ,६०३ करोना मृत्यू दडविलेगेल्यावर्षीचा हा क्रम याही वर्षी सुरूच आहेआता यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे काआजही अंत्यसंस्कारांसाठी वेटिंग पिरिएड आहेदेशात दररोज ,००० मृत्यू करोनामुळे नोंदले जात असताना त्यातील ८५० हे महाराष्ट्रातील आहेत आणि सरकार आपले कौतुक करण्यात व्यस्त आहेमराठवाडाविदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र यासारख्या भागांकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष आहेत्यांना देवाच्या आधारावर सोडून देण्यात आले आहेग्रामीण भागात बेड्स नाहीतउपचार नाहीतरेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी संघर्ष आहेशेवटी विविध न्यायालयांना हस्तक्षेप करीत आदेश द्यावे लागले आहेतग्रामीण महाराष्ट्रात करोना संसर्ग आणि मृत्यूची स्थिती अतिशय वाईट आहेरेमडेसिवीरच्या काळाबाजारीत सरकारी डॉक्टर पकडले जाताततर त्यांचा पीसीआर सुद्धा मागितला जात नाहीअशी स्थिती आहे,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

संपूर्ण जग मोदींच्या प्रयत्नांकडे विश्वासाने पाहतेय

कधीकधी लॉकडाऊन हा उपाय असतोपण असं करताना गरीबउपेक्षितशेतकरी यांना पॅकेज देणं अपेक्षित असतेअनेक छोटी राज्य मदत देत असताना महाराष्ट्रात मात्र अर्थसंकल्पीय आकड्यांची पॅकेजमध्ये बनवाबनवी करण्यात आली आहेआपली प्रतिमा सुधारण्यासाठी समाजमाध्यमांचे टेंडर जारी केले जातातपण गरिबांना मदत मिळत नाहीअसं असताना सुद्धा आम्ही रचनात्मक विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोतसंकटात सूचना करणे हे विरोधी पक्षाचे कामच असतेपणनकारात्मक वातावरणाची निर्मिती होणार नाहीयाचीही काळजी घेतली जाणे आवश्यक असतंकेंद्र सरकारवर टीका करताना काँग्रेसची किंवा काँग्रेसच्या पाठिंब्यांनी चालणार्या सरकारांना सुद्धा सल्ला देणं हे काम सुद्धा आपण (सोनिया गांधीकेले पाहिजेआज संपूर्ण जग मोदींच्या प्रयत्नांकडे विश्वासाने पाहते आहेत्यामुळे जगातील अनेक देश मदत देण्यासाठी पुढे आले आहेतभारतीय वॅक्सिनला नाकारणारा काँग्रेस पक्ष आज त्यावरच राजकारण करताना दिसून येतोखरे तर वॅक्सिनचे उत्पादन वाढते आहेऑगस्ट ते डिसेंबर या काळात २०० कोटी वॅक्सिन उपलब्ध होणार आहेतअर्थात भारतीय वॅक्सिनबाबतीत काँग्रेसचा विश्वास वाढतोयही अतिशय आनंदाची बाब आहेया संकटात केवळ राजकारण  करता काँग्रेस पक्ष एका रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका वठवेल,” असं म्हणत ‘ये पब्लिक हैसब जानती है’, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.