धुक्यामुळे रस्त्यावर अपघात होऊन १३ जणांचा मृत्यू

January 20,2021

कोलकाता : २० जानेवारी - धुक्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भीषण रस्ता अपघात झाला असून यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. येथील जलपाईगुडी जिल्ह्यातील धुपगुडी येथे  रात्री ही घटना घडली.

उत्तर भारतात सध्या थंडीची लाट आली सुरु असून त्याचे परिणाम देशाच्या इतर भागातही पहायला मिळत आहेत. तापमानात कमालीची घट झाल्याने पश्चिम बंगालमधील काही भागात पहाटेच्या सुमारास दाट धुकं पहायला मिळत आहेत. यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दाट धुक्यामुळे येथे जलपाईगुडी जिल्ह्यात काल रात्री भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात १३ जणांचा जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.