रेल्वेत नोव्हेंबर महिन्यात मालवाहतूक वाढली

December 03,2020

नवी दिल्ली : ३ डिसेंबर - रेल्वेने मालवाहतुकीतून मिळणार्या लाभाच्या आकडेवारीची गती कायम ठेवली असून, नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक वाढली आहे. रेल्वेच्या माल वाहतुकीत नोव्हेंबर २०२० या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत मालवाहतुकीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मालवाहतुकीतून रेल्वेने मागील महिन्यात १० हजार ६५७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा मालवाहतूकीतून १०६५७.६६ कोटी रुपये इतकी कमाई केली, जी गतवर्षी याच काळात झालेल्या उत्पन्नापेक्षा ४४९.७९ कोटी रुपये अधिक आहे. नोव्हेंबर २०२० या महिन्यात १०९.६८ दशलक्ष मेट्रिक टन मालाची वाहतूक करण्यात आली. यात ४८.४८ दशलक्ष मेट्रिक टन कोळसा, १३.७७ दशलक्ष मेट्रिक टन लोहखनिज, ५.१ दशलक्ष मेट्रिक टन अन्नधान्य, ५.४१ दशलक्ष मेट्रिक टन खते आणि ६.६२ दशलक्ष मेट्रिक टन सिमेंटची वाहतूक करण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली.

या कालावधीत दररोज सरासरी ५८ हजार ७२६ वाघिणींमध्ये माल लादण्यात आला. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत त्यात ४.६ टक्के वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळातील सुट्या, निवार चक्रीवादळाचा मालवाहतुकीवर परिणाम होऊन देखील भारतीय रेल्वेने ऑक्टोबरमध्ये १५ टक्के आणि सप्टेंबरमध्ये १५ टक्के अशी समाधानकारक आकडेवारी नोंदवत आपली आर्थिक सुधारणा स्थिर होत असल्याचे दर्शविले आहे. टाळेबंदीच्या काळात प्रवासी वाहतूक बंद असली, तरी रेल्वेने मालवाहतुकीतून चांगले उत्पन्न मिळवले आहे.

सरकारने व्यापार्यांना रेल्वे मालवाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या होत्या. माल वाहतुकीवर संस्थागत आणि आगामी शून्यावर आधारित वेळापत्रकानुसार कार्यवाही केली. कोरोना महामारीचा वापर देखील रेल्वेने आपली सर्वांगीण कार्यक्षमता आणि कामगिरी सुधारण्यासाठी केला आहे. त्याचा फायदा रेल्वेला झाला आहे.