आजही काँग्रेसचे नेते निवडणूक काळात हॉलिडे मूड मध्ये - प्रकाश आंबेडकर

November 25,2020

सांगली : २५ नोव्हेंबर - काँग्रेस सोबत जाण्याबाबत आपण अनुकूल होतो, मात्र काँग्रेसने जागावाटपाच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला नाही. जर कॉंग्रेसकडून पुन्हा हात पुढे आल्यास विचारू करू, पण माझ्या दृष्टीने काँग्रेस आता संपली आहे. आजही काँग्रेसचे नेते निवडणूक काळात देखील हॉलिडेच्या मूडमध्ये आहेत. अशा पक्षाचे मग कल्याणच आहे, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. सांगली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना आंबेडकर म्हणाले, केंद्राचे कायदे न पाळणे ही देशाशी बगावत असल्याचे ते म्हणाले. पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे .

आंबेडकर म्हणाले, राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारकडून केंद्राचे आदेश पाळण्यात येत नाही. केंद्राचे जे कायदे किंवा आदेश असतील ते राज्य सरकारला पाळणे संविधानानुसार गरजेचे आहे. पण राज्य सरकार जर आदेश धुडकावून लावत असतील तर हा विद्रोह आहे. जर राज्य सरकार बगावत करत असेल तर केंद्र सरकार घटनेतील तरतुदीनुसार केंद्र ३५६ कलम लावू शकते.

विरोधी पक्षातील उमेदवाराचा पदवीधरांशी आणि शिक्षकाशी आतापयर्ंत कसलाही संबंध आला नसल्याचे सांगत आंबेडकर म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक निवडणूका आतापयर्ंत विना अजेंडा लढवल्या जात होत्या. आताही सगळे उमेदवार कारखानादार आहेत. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल व्हावा यासाठी आम्ही या निवडणूका लढवत आहोत. आरक्षित वगार्तील मतदार आमच्यासोबत राहील ही अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. राज्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयामध्ये फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे.