देशातील खासगी शाळा विक्रीच्या मार्गावर

September 20,2020

नवी दिल्ली : २० सप्टेंबर - जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमेरिका, भारत, ब्राझील या देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनामुळे भारतातील शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. देशातील केजी पासून १२ पयर्ंतच्या शाळा आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विक्रीच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये या शाळांच्या विक्रीतून ७ हजार ५00 कोटी रुपये उभारले जाऊ शकतात.

शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सेरेस्ट्री वेंचर्सने मिळवलेल्या आकडेवारीनुसार बंद होणार्या शाळांमधील सर्वाधिक शाळा या वार्षिक ५0 हजार रुपये शुल्क आकारणार्यांपैकी आहेत. यानुसार भारतातील ८0 टक्के विद्यार्थी याच शाळांमध्ये शिक्षण घेतात. अनेक राज्यांनी शाळांना शुल्क घेण्यासाठी र्मयादा आखून दिल्या आहेत. परंतु शिक्षकांचे वेतन आणि इतर खर्च सुरू आहे. यामुळे देशातील खासगी शाळांची परिस्थिती बिकट झाली आहे. देशातील एका मोठ्या खासगी शाळेच्या समुहाला आपल्या कर्मचार्यांच्या वेतनावर तब्बल ७0 टक्के रक्कम खर्च करावी लागते, अशी माहिती सेरेस्ट्रामधील भागीदार विशाल गोयल यांनी सांगितले. भविष्यातील परिस्थितीत कशी असेल याची शाश्वती नसल्यामुळे या शाळांना मिळणारी देणगीही नाहीच्याच बरोबर आहे. यामुळे या शाळांसमोर प्रश्न अधिक बिकट झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

गोयल यांच्या कंपनीच्या केजी ते १२ वी पयर्ंतच्या ३0-३२ शाळा आहे. या शाळांमध्ये १ हजार ४00 कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक असल्याचेही सांगण्यात येत आहे. युरोकिड्स इंटरनॅशनलच्या देशभरात ३0 शाळा आहेत. हा समुहदेखील शिक्षण क्षेत्रातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. 

अनेकदा या शाळांच्या प्रमोटर्सना निरनिराळ्या गुंतवणुकीमुळे समस्यांचा सामना करावा लागतो. त्याच्या अन्य व्यवसायांवर झालेले परिणाम शाळांना भोगावे लागतात, असे युरोकिड्स इंटरनॅशनलचे सह-संस्थापक आणि समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजोध राजन यांनी सांगितले. आपल्या महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणमध्ये २0 ते २५ शाळा असून त्यांच्या विक्रीचा विचार सुरू असल्याची माहिती लोएस्ट्रो अँडहाझर्समधील भागीदार राकेश गुप्ता यांनी सांगितले. गेल्या वर्षी हाँगकाँगच्या नॉर्ड अँग्लिया एज्युकेशनने भारतातील ओकरिज इंटरनॅशनलच्या शाळांच्या समुहाची खरेदी केली होती. यामध्ये हैदराबाद, विशाखापट्टणम, बेंगळुरू आणि मोहालीमधील शाळांचा समावेश होता. या शाळांची विक्री १ हजार ६00 कोटी रुपयांमध्ये करण्यात आली होती. परंतु आता जेव्हा या शाळांच्या विक्रीची वेळ आली तेव्हा त्यांना ३0 ते ४0 टक्के कमी रक्कम देण्यात येत आहे.