मेळघाटात दरड कोसळल्याने तीन गावांचा संपर्क तुटला

July 26,2021

अमरावती : २६ जुलै - राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजला आहे. पावसाच्या या जोडीने शेतातील कामंसुद्धा थांबली आहेत. दऱ्याखोऱ्यांनी समृद्ध असलेल्या मेळघाटातील लहान मोठ्या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. मेळघाटातील अनेक पूल हे ब्रिटिश कालीनअसून कमी उंचीचे असल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे जिल्हा मुख्यालयापासून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मेळघाटात ढगफुटी झाल्याने मेळघाटातील सेमाडोह- माखला व चुनखडी मार्गावरील दीड किलोमीटरपर्यंत पहाड खचल्याने या मार्गावरील तीन गावे संपर्कविना आहे तर एक आठवडापेक्षा जास्त कालावधी या मार्गावरील साचलेला चिखल व दरड हटवण्यासाठी लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल, झाडे, दगडांचा मोठा खच तब्बल दीड किलोमीटरपर्यंत आहे. यामुळे या ठिकाणी साधन व साहित्य पोहचण्यासाठी वेळ लागणार आहे तर एक कोटी रुपये या कामाचा खर्च आहे अशी माहिती आहे. पहाड खचून दरड कोसळल्याने माखला, बीच्छुखेडा व माडीझडप हे तीन गावे गेल्या चार दिवसांपासून संपर्कक्षेत्रा बाहेर आहे. त्यामुळे रस्त्यावर असलेली दरड तातडीने हटवण्याची गरज आहे. या गावात दोन गर्भवती माता असून त्यांच्यापर्यंतसुद्धा प्रशासनाची मदत अद्याप पोहोचली नाही. मेळघाट दऱ्या खोऱ्यात सातपुडा रांगेत वसलेलं आहे. अमरावती जिल्ह्यात मागील 48 तासापासून सरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या या जोडीने शेतातील कामंसुद्धा थांबली आहेत. दऱ्याखोऱ्यांनी समृद्ध असलेल्या मेळघाटातील लहान मोठ्या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. मेळघाटातील अनेक पूल हे ब्रिटिश कालीनअसून कमी उंचीचे असल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे जिल्हा मुख्यालयापासून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आठवडाभरापासून पाऊस सुरूच होता. मात्र, दुपारच्या अचानक इतका पाउस झाला काही क्षणातच साऊर गावातील रस्ते व शेती पाण्याखाली गेली. त्यामुळं गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली. अमरावती चांदुरबाजार रोडवरील पुसदा येथे पुलावरून पाणी वाहू लागल्यानं या रस्त्यावर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. तर, शिराळा शिवारात शेतात पाणी साचल्यानं पिके पाण्याखाली गेली. दर्यापूर तालुक्यात थिलोरी येथे पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यानं थिलोरी गावात पाणी शिरलं.